नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

शिव स्वराज बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने बांबरुड (राणीचे) येथील युवकांला “कृषी रत्न आदर्श युवा शिखर आयकॉन अवार्ड” पुरस्काराने केले सन्मानित


Advertisements
Ad 4

शिव स्वराज बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने बांबरुड (राणिचे) येथील किरण अशोक सुर्यवंशी यांना कृषी रत्न आदर्श युवा शिखर आयकॉन अवार्ड” पुरस्काराने सन्मानित केले. बांबरुड राणिचे (ता.पाचोरा) ता.२० पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील किरण अशोक सुर्यवंशी यांनी कला शाखेतील पदवी व डी. एड शिक्षण नोकरी च्या मागे न लागता शेती करण्यावर भर दिला. शेतीची आवड असल्याने किरण अशोक सुर्यवंशी यांची नेहमीच विविध प्रयोग करून त्यांनी विविध पिकांचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असून.किरण च्या वडीलांचे सांगने आहे की “नोकर न बनता,मालक बना” हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन किरण अशोक सुर्यवंशी हा शेती क्षेत्रात प्रयत्नशील आहेत. किरण अशोक सुर्यवंशी यांच्या कार्याची दखल घेऊन शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था (पुनतगाव ता.नेवासा,जि, अहिल्याबाई नगर) तर्फे त्यांना दि. २० एफ्रिल रोजी महामानव विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय “कृषी रत्न आदर्श युवा शिखर आयकॉन अवार्ड” पुरस्काराने श्वेता परदेशी (मिसेस इंडिया विजेता)सिस्टर सिबी जाॅन (समाजसेविका) समाजभुषण गोल्डन मैन दिलीप भाऊ खरात व समाजभुषण संजय वाघमारे (शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष) यांच्या हस्ते पुनतगान ता.नेवासा जि .अहिल्याबाई नगर येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्वेता परदेशी (मिसेस इंडिया विजेता)सिस्टर सिबी जाॅन (समाजसेविका) समाजभुषण गोल्डन मैन दिलीप भाऊ खरात सौ.हेमा जाधव पुणेकर,शिवशाहीर,बालशाहीर ओवी प्रसाद काळे,इशिका सुर्यवंशी पुणेकर ,समाजभुषण संजय वाघमारे (शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष)बाळासाहेब शिरसाठ (शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था उपाध्यक्ष)सौ, ताई साहेब संजय वाघमारे (शिव स्वराज बहुउद्देशीय संस्था सचिव )व इतर मान्यवर उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button