नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
राजकारणसंपादकीय

महायुतीचा झंझावात: महाराष्ट्रात विरोधक केवळ चर्चेपुरतेच? ठोस विरोध दिसत नाही


Advertisements
Ad 4

राहुल महाजन,संपादक | महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षांत अनेक अभूतपूर्व वळणे घेतली आहेत. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांचे निकाल आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठीची तयारी पाहता, राज्यात सध्या ‘महायुती’ विरुद्ध ‘शून्य विरोधक’ असे चित्र निर्माण होताना दिसत आहे. ‘कसब्या’पासून ‘कोकणा’पर्यंत आणि ‘गडचिरोली’पासून ‘मुंबई’पर्यंत सध्या केवळ महायुतीच्या कार्याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेले यश हे केवळ राजकीय विजय नसून, तो जनतेने महायुतीच्या धोरणांवर मारलेली मोहोर आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत महायुतीला कौल दिला आहे. यामुळे विरोधकांचे अस्तित्व केवळ कागदावर किंवा सोशल मीडियापुरते मर्यादित राहते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोदींच्या नेतृत्वाखालील ‘डिजिटल’ क्रांती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र आणि राज्य सरकारने ग्रामीण भागापासून मेट्रो सिटीपर्यंत कामांचा धडाका लावला आहे. पूर्वी ज्या कामांसाठी ग्रामीण जनतेला सरकारी कचेऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागायचे, ती कामे आता एका ‘क्लिक’वर होत आहेत.रस्ते, मेट्रो आणि दळणवळणाच्या साधनांमुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलत आहे.

‘वॉटर, गटर आणि मीटर’ वर महायुतीचे लक्ष!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रामुख्याने पाणी (Water), सांडपाणी व्यवस्था (Gutter) आणि वीज (Meter) या मूलभूत प्रश्नांवर लढवल्या जातात. महायुतीने या त्रिसूत्रीवर भर देऊन सामान्य माणसाच्या दैनंदिन समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले आहे. जेव्हा विरोधक केवळ भावनिक मुद्द्यांवर राजकारण करत होते, तेव्हा महायुतीने जमिनीवर उतरून काम करण्यावर भर दिला.

  • विरोधकांची युती: केवळ चर्चेचा विषय?

राजकारणात उद्धव ठाकरे यांची ‘शिवसेना (UBT)’ आणि ‘मनसे’ एकत्र येण्याच्या चर्चांनी मध्यंतरी जोर धरला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असली, तरी प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाहीये. याउलट, काही ठिकाणी ‘महायुती विरुद्ध महायुती’ असेच चित्र पाहायला मिळत आहे, म्हणजेच खरी स्पर्धा ही महायुतीच्या अंतर्गत घटक पक्षांमध्येच आहे की काय, असे वाटण्याइतपत विरोधक निष्प्रभ झाले आहेत. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महायुतीचे कार्य पोहोचले आहे. विरोधकांकडे सध्या तरी सत्तेला पर्याय देणारा ठोस कार्यक्रम किंवा चेहरा दिसत नसल्याने, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्येही महायुतीचा प्रवास रोखणे कठीण असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button