नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील रवींद्र पाटील (मनोज आप्पा) यांची सरपंच ग्राम संवाद असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती


Advertisements
Ad 4

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच रवींद्र उत्तमराव पाटील यांची नुकतीच ग्राम संवाद सरपंच असोसिएशन पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. ते गोराडखेडा खुर्द सरपंच पदाचा कार्यभार सांभाळत असून त्यांची ग्राम संवाद सरपंच असोसिएशन तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या कार्यास अधिक बळ मिळणार आहे. सोबतच गावासह परिसरातील समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अधिक सोयीचे होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे ग्रामपंचायत पदाधिकारी गोराडखेडा खुर्द, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, तथा पदाधिकारी ग्रामपंचायत गोराडखेडा बु, विविध कार्यकारी सोसायटी गोराडखेडा यासह गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button