नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य

‘हिंद की चादर’ सोहळ्यासाठी पाचोरा तालुक्यातून भाविक रवाना; तहसीलदार विजय बनसोडे यांनी दाखवला हिरवा कंदील


Advertisements
Ad 4

पाचोरा: हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम पर्वाचे आयोजन नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आले आहे. ‘हिंद की चादर’ या विशेष सोहळ्यासाठी पाचोरा तालुक्यातील बंजारा, लभाना, शिख, शिकलकरी, सिंधी, उदासीन आणि वारकरी संप्रदायाचे भाविक मोठ्या उत्साहात रवाना झाले. याप्रसंगी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या वतीने २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी आयोजित या भव्य कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुचित्रा पवार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्री उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्देश

इतिहासाचे जागरण: गुरु तेग बहादूर, गुरु गोविंद सिंग आणि चार साहिबजादे यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

विविध समाजांचा सहभाग: बंजारा, लुभाना, मोहिवाल, शिंदी, जोहरी आणि उदासी यांसारख्या गुरु नानक नामलेवा संगतीतील विविध समाजांचा यात सक्रिय सहभाग असून, त्यांच्या शौर्याचे आणि त्यागाचे स्मरण या निमित्ताने केले जात आहे.

नियोजन: २७ फेब्रुवारी रोजी नगर कीर्तन पार पडले, तर २८ फेब्रुवारी रोजी नामवंत संत-महंतांचे प्रवचन होणार आहे. १ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करतील. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे १५ लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मुख्य संयोजक व आरोग्य दूत रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांच्या निवास आणि भोजनाची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे.
पाचोरा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार विजय बनसोडे यांच्या वतीने शुभेच्छा देत तालुक्यातील भाविकांचा हा भाविक नवी मुंबईकडे मार्गस्थ झाले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button