पाचोरा न्यायालयाचा निकाल! मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपींना कारावास; पोलीस पथकाचा गौरव

पाचोरा (राहुल महाजन,पत्रकार):
पाचोरा येथील मेहेरबान न्यायालयात पाच वर्षांपूर्वीच्या एका मारहाणीच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल लागला आहे. न्यायाधीश एस. व्ही. निमसे यांनी आरोपींना विविध कलमान्वये दोषी ठरवत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या यशस्वी पैरवीबद्दल जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव केला आहे. सन २०२० मध्ये पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या गु.र.नं. २१७/२०२० नुसार, फिर्यादी गौतम किसन अहिरे यांनी आरोपी साहेबराव किसन अहिरे व इतर २ यांच्याविरुद्ध गंभीर मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दिली होती. या प्रकरणाचा खटला (Rcc No : २५०/२०२०) पाचोरा न्यायालयात सुरू होता. दिनांक १२/०१/२०२६ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे आरोपींना CRPC २४८(२) नुसार दोषी ठरवले. भा.द.वि. कलम ३२६ नुसार ६ महिने सश्रम कारावास आणि १,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास).
- भा.द.वि. कलम ३२४: ३ महिने साधा कारावास आणि ५०० रुपये दंड (दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास). • भा.द.वि. कलम ३२३: १ महिना साधा कारावास आणि ३०० रुपये दंड (दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास). • कलम ५०४ व ५०६: या कलमांतून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता चंद्रकांत अ. नाईकवाडे, वि. सहा. सरकारी अभियोक्ता प्रशांत भावसार आणि ॲड. करुणाकर ब्राह्मणे यांनी प्रभावी युक्तिवाद केला असून पैरवी अधिकारी हवालदार दिपक पाटील तसेच विकास सूर्यवंशी यांनी केलेल्या उत्कृष्ट पाठपुराव्यामुळे आरोपींना शिक्षा लागली आहे. या प्रक्रियेत पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.





