नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील पहाण गावात वादळी पावसाने लाखांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्त!एक बेल ठार


Advertisements
Ad 4

पाचोरा, १२ जून २०२५: काल, ११ जून २०२५ रोजी रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान पाचोरा तालुक्यातील पहाण गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेड्स, फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, एका शेतकऱ्याचा बैल मृत्युमुखी पडला आहे. गावात अंदाजे २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शेड्स आणि पिकांचे नुकसान
प्रभुलाल शिवदास पाटील यांच्या शेडचे नुकसान होऊन त्यांना सुमारे २ लाख रुपयांचा फटका बसला आहे. याशिवाय, दत्तू हरी पाटील, ज्ञानेश्वर महाजन, आबाजी गोबा पाटील, लक्ष्मण पंडित पाटील, सुनील रामदास पाटील यांच्यासह इतर अनेक शेतकऱ्यांच्या शेड्सचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे शेड पूर्णपणे उडून गेले असून, प्रत्येकी शेतकऱ्याला १ ते १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

फळबागांचा हाहाकार
वादळी वाऱ्याने आणि पावसाने फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशांत युवराज पाटील, रितेश शिवराज पाटील, बाबू हरी पाटील, प्रकाश भाऊराव पाटील, प्रभाकर आधार पाटील, ज्ञानेश्वर भिका महाजन,अतुल नारायण महाजन, स्वप्नील नारायण महाजन,भिका महाजन यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या लिंबू, मोसंबी आणि केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

पशुधनाची हानी
ईश्वर काशिनाथ पाटील यांच्या बैलाचा वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झाला आहे, ज्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे आवाहन
पहाण गावातील शेतकरी आता प्रशासनाकडून तातडीने नुकसान भरपाई आणि मदतीची अपेक्षा करत आहेत. गावातील एकूण नुकसान २० ते २५ लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, लवकरच मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

या संकटामुळे पहाण गावातील शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना आधार देण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button