नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यात शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा; वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शाळांना नोटीस बोर्ड भेट


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा, दि. १९ जून २०२५: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन पाचोऱ्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला आहे. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महादेव मंदिरात पूजन, अभिषेक आणि आरतीने झाली असून त्यानंतर शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले असून वैशालीताई सूर्यवंशी यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना म्हटले, संकटात सावरून उभे राहणे हीच खरी शिवसेना! उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांचे जिवंत रूप आहेत. त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहूया

वर्धापन दिनाचे औचित्य साधून समाजसेवेचा वसा जपत पाचोरा आणि भडगाव येथील जिल्हा परिषद शाळांना नोटीस बोर्ड भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. पाचोऱ्यातील कृष्णराव सोसायटी, सिंधी कॉलनी आणि भडगाव येथील जय हिंद कॉलनी, टोणगाव शाळांना नोटीस बोर्ड प्रदान करत शैक्षणिक विकासासाठी ठोस पाऊल उचलले गेले.

या प्रसंगी ॲड. अभय पाटील, योजनाताई पाटील, मनीषा पाटील, द्वारकाबाई सोनवणे, अनिल सावंत, शशिकांत पाटील, मनोज चौधरी, अभिषेक खंडेलवाल, हरीश देवरे, खंडू सोनवणे, चेतन पाटील, माधव जगताप, भैया भाऊ सूर्यवंशी, रतन परदेशी, विजय साळुंखे, राजू चव्हाण, अरुण तांबे, ज्ञानेश्वर चौधरी, सिकंदर तडवी, गजू पाटील, रमेश पाटील, मिथुन वाघ, पंढरी पाटील, एकनाथ महाराज, संजय चौधरी, राजधर आबा, गोविंद पाटील, अकिल शेख, सलीम खान, नितीन महाजन, आवेश खान, नामदेव चौधरी, आवेश खाटीक, अजय तेली, निकित पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button