नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा येथे लोक न्यायालयात 1058 प्रकरणांचा निपटारा! शासनाची कोट्यवधींची वसुली,कौटुंबिक वादाचे 20 प्रकरणे मार्गी.


Advertisements
Ad 4

पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती, पाचोरा व पाचोरा तालुका विधिज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने 22 मार्च रोजी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर जी. एस बोरा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस.व्ही. निमसे, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण 166 इतकी प्रकरणे निकाली होवून त्यात 2 कोटी 4 लाख 14 हजार 583 रुपये इतकी वसुली झाली. तसेच वादपूर्व 892 प्रकरणांचा निपटारा होवून यात 2 कोटी 14 लाख 26 हजार 892 रुपये इतकी रक्कम वसुल झाली आहे. एकूण 4 कोटी 18 लाख 41 हजार 475 रुपये इतकी रक्कम वसूल झाली आहे. यावेळी दहा वर्षे जुने चार दिवाणी दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले.

तसेच व्हर्च्युअल पद्धतीने दोन प्रकरणे निकाली काढले, तसेच कौंटूंबिक वाद मधील 20 प्रकरणे निकाली निघाले. यावेळी पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती जी एस बोरा तसेच पंच सदस्य म्हणून श्रीमती ललिता पाटील यांनी कामकाज पाहिले. तसेच सदर लोक न्यायालय यशस्वी करण्याकरिता पाचोरा न्यायालयातील सर्व वरिष्ठ, कनिष्ठ विधिज्ञ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बँक अधिकारी, कर्मचारी, बी. एस. एन. एल. अधिकारी, कर्मचारी, वीज महावितरण अधिकारी, कर्मचारी, पाचोरा व पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी तथा न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक, कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार आपल्या प्रकरणांमध्ये तडजोड करून घेण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button