नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराजकारणशैक्षणिक

पाचोरा येथे तापी जनविकास पर्यावरण संस्थे तर्फे गणेश मंडळाना ढाल वितरण सोहळा!


Advertisements
Ad 4

दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी पाचोरा येथे गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्था, पाचोरा भडगाव संस्थेतर्फे पर्यावरण रक्षण व संवर्धन, लोकसंख्या नियंत्रण, राष्ट्रीय एकात्मता, स्त्रीभ्रूण हत्या विरोध, देहदान व अवयव दान या विषयांवर उत्कृष्ट आरास देखावे सादर केलेल्या गणेश मंडळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वरूपात ढाली देण्यात आल्यात. ‘स्त्रीभ्रूण हत्या विरोध’ या विषयावरील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ पहिल्या क्रमांकाची ढाल श्री गणेश लक्ष्मी प्रतिष्ठान, संत गाडगेबाबा नगर यांना सौ. उज्वला महाजन, अशोक महाजन यांच्या हस्ते देण्यात आली.’लोकसंख्या नियंत्रण’ या विषयावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाची ढाल श्री गणेश लक्ष्मी प्रतिष्ठान, संत गाडगेबाबा नगर यांना आनंद नवगिरे यांच्या हस्ते देण्यात आली. ‘अवयव दान व देहदान’ या विषयावरील कॉम्रेड ज्योती बसू यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकाची ढाल श्री गणेश लक्ष्मी प्रतिष्ठान, संत गाडगेबाबा नगर यांना प्राचार्य डी. एफ. पाटील सर यांच्या हस्ते देण्यात आली. श्री.गणेश लक्ष्मी प्रतिष्ठान संत गाडगेबाबा नगर येथील रमेश गवळी, संजय पाटील, सचिन जाधव, शंभू झांजोटे, दिवाकर सुरवाडे, अक्षय घोडके, कृष्णा व्यास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृषाली गोकुळ चव्हाण (मुंबई) या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद नवगिरे यांनी केले. या प्रसंगी गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष व्ही. टी. जोशी, शीला पाटील, उज्वला महाजन, विद्या कोतकर, प्रा. डॉ. सुनिता मांडोळे, नयना कापुरे यांनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उज्वला महाजन यांनी केले, तर आभार वर्षा राठोड यांनी मानले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button