नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्या

जळगाव: पाचोरा येथे १८ तलवारी जप्त, एकाला अटक


Advertisements
Ad 4

पाचोरा, जि. जळगाव: पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील माहीजी नाका परिसरातून एका तरुणाला बेकायदेशीरपणे १८ तलवारी बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. या तलवारी तो विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन आला होता. या प्रकरणी त्याच्याकडून सुमारे ५४,००० रुपयांच्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ च्या सुमारास पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शहरातील माहिजी नाका येथे एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात तलवारी आहेत आणि तो त्यांची विक्री करणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत स्मशानभूमी रोडवरील सोहेल शेख तय्यब शेख (वय २४) याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने विक्रीसाठी आणलेल्या एकूण १८ तलवारी एका लपवलेल्या ठिकाणाहून काढून पोलिसांच्या स्वाधीन केल्या. तसेच, त्याने यापूर्वीही काही तलवारी विकल्याचे सांगितले.

याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक ४६०/२०२५ अंतर्गत भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरी कृष्णा घायाळ, पोउपनिरी कैलास ठाकुर, पोकॉ संदीप राजपुत, पोकॉ जितेंद्र पाटील, आणि पोकॉ हरीष परदेशी यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button