नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील माहेजी गावातील तरुणाचा डोहात बुडून मृत्यू!


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: दिनांक १५ मे,२०२५ रोजी गिरणा नदीवर म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयत आकाश यादव गुरुवारी दुपारी पाच वाजेचा सुमारास माहेजी शिवारात म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेला होता. माहेजी येथील आकाश राजेश यादव (वय २२) गुरुवारी दुपारी पाच वाजेचा सुमारास म्हशींना पाणी पाजण्यासाठी गिरणा नदीवर घेऊन गेला होता. सध्या नदीपात्र कोरडे असले, तरी काही भागात मोठे डोह असून, त्यात पाणी आहे. त्या ठिकाणी म्हशींचे पाणी पिऊन झाल्यानंतर आकाश म्हशींना घेऊन घराकडे निघणार होता. मात्र, काही म्हशी गिरणा नदीपात्रात मध्यभागी गेल्याने त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आकाश नदीत उतरला. मात्र, पाण्याचा व खोल डोहाचा त्याला अंदाज न आल्याने आकाश डोहात बुडाला होता. आकाश घेऊन गेलेल्या म्हशी गोठ्यात पोहोचल्या. मात्र, आकाश न आल्याने त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर त्याला शोधण्यासाठी गेला. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. ज्ञानेश्वरने आई सरलाबाई व वडील राजेश यांना आकाश दिसत नसल्याचे सांगितले. सर्वांनाच नदीपात्रात बुडाला असावा असा संशय आल्याने पोलिस पाटील राजेंद्र पाटील, पोस्टमन संजय बडगुजर, समाधान पाटील, अशोक पवार, कृष्णा गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांच्या सहकार्यान नदीपात्रातील डोहात आकाशचा शोध घेतला. सुमारे दीड तासांनी डोहातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दहिगाव धरण क्षेत्रातील पाण्याचा वसारा असल्याने गिरणा नदीत डोह तयार झाले आहेत. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. मृत आकाशच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे माहेजी गावावर शोककळा पसरली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button