नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा शहरात घराची भिंत कोसळून आजी जखमी; आमदार किशोर पाटील यांनी घेतली तातडीने दखल, रुग्णालयात दाखल


Advertisements
Ad 4

पाचोरा, १२ जून २०२५: काल, ११ जून २०२५ रोजी पाचोरा शहरातील मुस्लिम भागात चक्रीवादळसदृश पावसामुळे एका घराची भिंत कोसळून आजी गंभीर जखमी झाल्या. या घटनेची तातडीने दखल घेत आमदार किशोर पाटील यांनी जखमी आजींना रात्रीच सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी आजींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. आमदार पाटील यांच्यासोबत पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे, नायब तहसीलदार विनोद कुमावत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, शेतकरी सेना उपजिल्हाप्रमुख हेमंत चव्हाण तसेच रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी तातडीने पाऊल उचलत जखमी आजींना त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून आजींच्या उपचाराची खात्री केली. सकाळी पुन्हा रुग्णालयात भेट देऊन डॉ स्वप्नील पाटील यांना भेटून त्यांनी आजींच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. याठिकाणी प्रांताधिकारी भूषण अहिरे आणि नायब तहसीलदार कुमावत यांनीही घटनास्थळाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून, पुढील मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
आमदार किशोर पाटील यांच्या तत्परतेचे स्थानिकांनी कौतुक केले आहे. “आमदार साहेबांनी रात्रीच आजींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. सध्या जखमी आजींची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पाचोरा शहरातील नुकसानग्रस्त भागात प्रशासनाकडून तातडीने मदत आणि पुनर्वसनाची मागणी होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button