भडगाव येथे संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न!

भडगाव, दि. २३ जुलै २०२५: येथील समस्त माळी पंच मंडळ आणि महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरणात प्रतिमा मिरवणूक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ९ वाजता शनी चौकातून महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साहेबराव महाजन आणि माळी समाजाचे अध्यक्ष मुकुंदा महाजन यांच्या हस्ते संत सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सजवलेल्या ट्रॅक्टरद्वारे मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक बाजार चौक, भागवत कॉलनी, कोठली रोडमार्गे मल्हारनगर येथील नियोजित माळी समाज मंगल कार्यालयापर्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, तेली समाजाचे अध्यक्ष नाना चौधरी, शिवसेना शहरप्रमुख अजय (आबा) चौधरी, दक्षता समितीचे जितू आचारी यांनी मिरवणुकीदरम्यान भेट देऊन प्रतिमेचे पूजन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि महाप्रसाद
मिरवणुकीनंतर मल्हारनगर येथील नियोजित माळी समाज मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष लखीचंद पाटील, माजी प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, डॉ. प्रमोद पाटील, माजी नगरसेविका योजना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, बालविकास प्राथमिक शाळेचे अध्यक्ष विजय महाजन, चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष रवी अहिरे, सामाजिक कार्यकर्ते देवा अहिरे, जगन भोई, महेंद्र ततार, साहेबराव महाजन आणि मुकुंदा महाजन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. तसेच, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगदान
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद महाजन, ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन, मनोज महाजन, भिकन महाजन, पत्रकार सागर महाजन, चेतन महाजन, नितीन महाजन, विजय माळी, अनिल महाजन, प्रा. राजेंद्र महाजन, गणेश माळी, प्रदीप महाजन, मनोज उत्तम महाजन, विजय महाजन, गोविंद महाजन, देवराम (आबा) महाजन, रमेश महाजन, अशोक महाजन, ॲड. विजय महाजन, शुभम शालीग्राम माळी, ओम अविनाश माळी, जिवन महाजन, दत्तामय महाजन, मनोज देशमुख, बबलू महाजन, अविनाश महाजन, रामगोपाल सैनी, दिनेश महाजन, सुकलाल महाजन यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले, तर गोकुळ महाजन यांनी आभार मानले.