नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराष्ट्रीय

विहीरीस भुमीगत जलस्त्रोत वाढवण्यासाठी शेतात शोश खड्डे करा! पाचोरा तालुक्यातील या शेतकऱ्याचे थेट दिल्लीत मार्गदर्शन;कृषी अधिकारी जाधव यांच्याकडून सन्मान


Advertisements
Ad 4

जळगाव:भारतीय कृषि अनुसंधान संशोधन परीषद, नवी दिल्ली (ICAR) अंतर्गत कृषि भवन येथे जलसंधारण अंतर्गत आयोजीत शेतकरी परीषदेत पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परीसरातील प्रगतशील शेतकरी व जलसंशोधक नामदेव विश्राम महाजन (नाना महाजन) यांना जलस्त्रोताची जलधारणा शक्ती वाढवण्यासंदर्भात आपल्या निरीक्षण संशोधन व अभ्यासाचा मार्गदर्शक म्हणुन आमंत्रीत करण्यात आलेले होते.

सदर कार्यक्रमात त्यांनी जमीनीत खालावत चाललेली जलधारण शक्ती कशा पध्दतीने व तंत्रज्ञानाने मृद संधारण पुरक जलस्त्रोतांची बळकटीकरण कामे केली पाहिजे त्यासंदर्भात मार्गदर्शक करतांना जमीन उताराच्या दिशेने खालच्या बाजुस ” शोष खड्डा ” करुन शिवारात असलेल्या कुपनलीका, विहीरीस भुमीगत जलस्त्रोत वाढवण्यासाठी महत्वपुर्ण ठरते. या उपचारामुळे शेती वाया न जाता जलस्त्रोताचे बळकटीकरण होवुनपाण्याची पातळी वाढते यावर त्यांनी आजतागायत अवर्षण प्रवण भागात केलेल्या अभीनव असा ” पाणी अडवा पाणी जिरवा ” या कमी श्रम दानातुन जलसंधारणाचा उपक्रमाचा मृत साठ्याच्या वाढीकरीताचा उपक्रम हा शेतकरी हिताचा व उत्पादन वाढीसाठी प्रभावशील असे संशोधन सर्वांसमोर मांडले. पुढील विवेचनात आपल्या संशोधन कार्यातुन केलेल्या संशोधनात हजारो शेतकरी या उपक्रमात सहभाग वाढवुन हजारो विहरी व कुपनलीका मधे पाणीसाठ्यात वाढ झाली. या अभीनव उपक्रमाची पाचोरा तालुका कृषी अधीकारी श्री आर.एन. जाधव यांनी दखल घेत जलसंशोधक नाना महाजन यांचा पाचोरा तालुका कृषी अधीकारी कार्यालयाकडुन विशेष सन्मानीत करीत क्षेत्रीय अधीकारी कर्मचारी वर्गाला या अभीनव उपक्रमाचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांना कसा होईल व जलधारण शक्ती वाढवण्यास त्याचा कसा फायदा होईल या बाबत मार्गदर्शन केले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button