गिरणा मोठा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन सुटले

मधुर खान्देश वृत्तसेवा: जिल्हाधिकारी जळगाव तसेच कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार दि. 16/05/2025 रोजी सकाळी 6.00 वाजता गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे बिगर सिंचन पाणीवापराचे चौथे आवर्तन 2000 Cusecs (56.63 Cumecs) इतका विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन हे भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानालदा पर्यंत आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठीचे असल्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतीचे पंप बंद ठेवावे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे अवाहन उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग
चाळीसगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर आवर्तन सोडावे यासाठी पाचोरा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता नागरिकांना कुठल्याही प्रकारची पाण्याची गैरसोय होऊ नये याबाबत सदर आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.