नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

गिरणा मोठा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन सुटले


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: जिल्हाधिकारी जळगाव तसेच कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिलेल्या आदेशानुसार दि. 16/05/2025 रोजी सकाळी 6.00 वाजता गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे बिगर सिंचन पाणीवापराचे चौथे आवर्तन 2000 Cusecs (56.63 Cumecs) इतका विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन हे भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानालदा पर्यंत आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठीचे असल्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतीचे पंप बंद ठेवावे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे अवाहन उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग
चाळीसगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर आवर्तन सोडावे यासाठी पाचोरा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता नागरिकांना कुठल्याही प्रकारची पाण्याची गैरसोय होऊ नये याबाबत सदर आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button