नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान!


Advertisements
Ad 4

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील १०० दिवसांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने मा. पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि. १९/०३/२०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दररोज शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार होत असुन व्यवहार होत असतांना बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात घनकचरा, पाला, पाचोळा, निर्माल्य संचित होत असतो. बाजार आवारामध्ये शेतमाल खरेदी विक्रीसाठी दररोज हजारो शेतकरी, हमाल-तोलारी, आडते, व्यापारी व इतर अनुषंगिक घटकांची मोठ्या प्रमाणात ये जा होत असते. बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याने या सर्व घटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो. राज्यातील सर्व बाजार समित्यांचे आवार स्वच्छ करण्याची मोहीम पुढील १०० दिवसात राबविण्याचे पणन विभागाने निश्चित केलेले आहे. सदरचे अभियान राबविण्यासाठी बाजार समितीतील सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, आडते, व्यापारी, हमाल-तोलारी व संबंधित घटक यांचा सहभाग अभियानात असावा असा पणन संचालक यांच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने सदर अभियाना अंतर्गत बाजार समितीच्या पाचोरा येथील मुख्य यार्डात दि.२३/०३/२०२५ वार रविवार रोजी सकाळी ठीक १०.०० आमदार श्री. किशोर आप्पा पाटील व म. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पाचोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील उपसभापती प्रकाश अमृत पाटील, संचालक प्रकाश शिवराम तांबे, मनोज प्रेमचंद सिसोदीय, युसुफ भिकन पटेल, सुनिल युवराज पाटील, लखीचंद प्रकाश पाटील, राहुल रंगराव पाटील, राहुल रामराव पाटील, विजय कडू पाटील, बाजार समितीतील व्यापारी सुभाष जगन्नाथ पटवारी, संजय छगनलाल सिसोदिया, राजेश पटवारी, नंदू पाटील, पारस जैन यांच्या सह बाजार समितीचे सचिव व सर्व कर्मचारी तसेच हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर अभियानाअंतर्गत बाजार समितीतील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व येथून पुढे असे स्वच्छता अभियान राबविण्याचा मानस आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला व त्याबाबत सूचना बाजार समिती प्रशासनास दिल्या. सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने आभार व्यक्त केले असुन सभापती गणेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक देऊन माहिती दिली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button