नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पावसाळापूर्व स्वच्छता मोहिमेला पाचोरा शहरात सुरुवात; आमदार किशोर पाटील यांच्या आदेशानुसार महत्त्वपूर्ण पाऊल


Advertisements
Ad 4

पाचोरा, दि. २१ मे – दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी पाचोरा शहरातील गटारी, नाले व भुयारी गटारांमधील गाळ काढण्याचे व चेंबर स्वच्छ करण्याचे काम पाचोरा नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यंदा अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात घेता, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा नगरपरिषदेला तातडीने स्वच्छता मोहिम सुरु करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी त्वरित कृती करत आरोग्य निरीक्षक तुषार नक्वाल यांना योग्य त्या सूचना देऊन मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक आठ येथून करण्यात आली. यावेळी प्रभागातील कार्यकर्ते बंडू केशव सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला. गटारी आणि भुयारी गटारांमध्ये वर्षभर साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची व रस्त्यांवर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरभर स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छता मोहिमेचे काम नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांद्वारे युद्धपातळीवर सुरू असून, प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता कामावेळी आरोग्य विभागाचे मुकादम पांडुरंग कोळी आणि भिकन गायकवाड यांच्या समक्ष कामकाज सुरू असल्याचे चित्र आहे. पाचोरा शहरातील सर्व प्रभागांमध्ये ही मोहिम नियोजनबद्ध रितीने राबवली जाणार असून, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. शहरातील स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा सक्षम ठेवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे असून, येत्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिलीं आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button