जळगावात पर्यावरणपूरक गणेशोत्सव: युवाशक्ती व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे रोपांचे वाटप

जळगाव, दि. ५ सप्टेंबर २०२५ (प्रतिनिधी) – युवाशक्ती फाऊंडेशन आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १७ वर्षांपासून जळगावातील काव्यरत्नावली चौकात आदर्श गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा मंडळाने रोपांच्या सहाय्याने सजीव बल्लाळेश्वर गणपतीची आकर्षक प्रतीकृती सादर करून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आहे.
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने, गणपती विसर्जनाच्या दिवशी शनिवार, दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून रोपांचे वाटप आयोजित करण्यात आले आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ आणि ‘एका परिवारास एक रोप’ या तत्त्वानुसार सजीव बल्लाळेश्वर तयार करण्यात आलेल्या रोपांचे प्रसाद स्वरूपात वाटप होईल.
मंडळाने नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रोपांचा स्वीकार करावा आणि पर्यावरण जतनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.






