नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीय

फौजी कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी उभाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल!


Advertisements
Ad 4

आरोप मात्र खोटे असल्याचा निलेश उभाळेंचा दावा.

पाचोरा, प्रतिनिधी (दि. १ जून) – जमीन व्यवहारात मध्यस्थी केल्याचा दावा करून भारतीय सैन्य दलातील जवान व त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या प्रकरणी भोजे (ता. पाचोरा) येथील निलेश नामदेव उभाळे यांच्याविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोजे येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले विलास बाबूलाल जाधव यांनी १ जून रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, भोजे शिवारातील एका प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारात कोणतीही मध्यस्थी केलेली नसताना निलेश उभाळे यांनी मध्यस्थी केल्याचा दावा करत ५० हजार रुपयांची मागणी केली.

फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने मोबाईलवर वारंवार संपर्क साधून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या वयोवृद्ध वडिलांनाही पैशांसाठी त्रास देत धमक्या दिल्या असल्यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली आले असून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०८(५), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल रामनाथ पवार करीत आहेत.

याबाबत निलेश उभाळे यांच्याशी संपर्क केला असता सदर गुन्हा हा खोटा असून यामध्ये कोणतीही सत्यता नसून ही सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button