नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीयशैक्षणिक

मतिमंद मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस पाचोरा न्यायालयात ‘कोर्ट उठेपावेतो’ शिक्षा व २५ हजार दंड


Advertisements
Ad 4

पाचोरा (प्रतिनिधी):
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एका मतिमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाचोरा न्यायालयाने ३१ मार्च २०२६ रोजी दोषी ठरवत महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायाधीश श्रीमती जी. एस. बोरा यांनी आरोपीला कोर्ट उठेपावेतो (निकाल लागल्यापासून कोर्ट सुरू असे पर्यंत) कारावास, १००० रुपये दंड आणि पिडीतेला २५,००० रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे. सन २०२३ मध्ये पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात फिर्यादी सुभाष तुकाराम सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून आरोपी बिस्मिल्ला इमाम मुसलमान याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता (गु.र.नं. २०४/२०२३). आरोपीने एका मतिमंद मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात Rcc no-178/2025 नुसार सुनावणी पार पडली. खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी आणि पीडिता यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. पुराव्यांच्या आधारे, न्यायालयाने आरोपी बिस्मिल्ला इमाम मुसलमान याला CRPC कलम २४८(२) नुसार दोषी ठरवले.

न्यायालयाने दिलेली शिक्षा:

  • शिक्षा: कोर्ट उठेपावेतो कारावास.
  • दंड: १,००० रुपये.
  • नुकसान भरपाई: पीडितेच्या पुनर्वसनासाठी व नुकसान भरपाई म्हणून २५,००० रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
    या केसमध्ये सरकारी अभियोक्ता श्री. पी. बी. भावसार यांनी प्रभावीपणे सरकारची बाजू मांडली. सदर तपास उपनिरीक्षक (PSI) अमोल पवार यांनी केला होता.
    पाचोरा विभागाचे SDPO मा. बापू रोहम साहेब आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सपोनि मा. कल्याणी वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी राजेंद्र पाटील (ब.नं. १२३४) आणि केस वॉच पो.ना. दीपक पाटील (ब.नं. १२८१) यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. न्यायाच्या या निर्णयामुळे परिसरात पोलिसांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या कामाचे कौतुक होत आहे.

संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button