नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा येथे राज्यस्तरीय आध्यात्मिक वारकरी बालसंस्कार शिबिर संपन्न!


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: भडगांव रोड वरील पुनगांव शिवारातील शक्तीधाम येथे ५ मे ते १५ मे या कालावधीत पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी संस्थेच्या वतीने भव्य अशा राज्यस्तरीय आध्यात्मिक वारकरी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मी माता वारकरी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात महाराष्ट्रातील जवळपास ३०० मुलं आणि मुली सहभागी झाले होते. या सर्व मुलांसाठी हे शिबीर निःशुल्क होते. तसेच सर्वांसाठी रहाणे, नास्ता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या शिबीराचा मुख्य उद्देश म्हणजे मोबाईल व सोशल मिडीयाच्या आहारी गेलेल्या बाल पिढीला संस्काराकडे नेण्यासाठी प्रयत्न करणे हाच होता. आज काल पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही म्हणून मुले सोशल मिडीयाच्या आहारी जात आहेत, आज मुलांमध्ये संस्काराची कमी जाणवते आहे म्हणून पाचोरा शहरातील भागवताचार्य योगेशजी महाराज धामणगावकर व अनाथांची माय सौ सुनिताताई पाटील पाचोरा या दोन्हीच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपात आध्यात्मिक बाल शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. बालसंस्कार शिबीरात विद्यार्थ्यांना योगासन, प्राणायाम व जीवनमूल्ये, व्यक्तीमत्व विकास, अभंग गायन, रामरक्षा, विष्णु सहस्रनाम, हनुमान चालीसा, ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा, आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबीरासाठी पाचोरा शहरातील दानशूर व्यक्तींनी विद्यार्थ्यांना शितपेय, नास्ता, भोजनाची व्यवस्था करुन दिली होती. यासाठी रमेश मोर यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. शेवटच्या दिवशी उपस्थित सर्व भाविक भक्तांना पुरणपोळी च्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या बालसंस्कार शिबीराचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे पोलीस उपनिरीक्षक भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर समारोप पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बालसंस्कार शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने व योगदानाने शिबिर निःशुल्क घेता आले असल्याचे भागवताचार्य योगेश महाराज व सुनिताताई पाटील यांनी सांगितले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button