नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यातील शिक्षक भरत पाटील लिखित “फुलताना” पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. व्ही.एल माहेश्वरी यांच्या हस्ते संपन्न


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा : प्रयोगशील शिक्षक हे देशाची संपत्ती आहे असे
मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय एल. माहेश्वरी यांनी मांडले आहे. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत “फुलताना” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला असून या प्रसंगी नोबेल फाऊंडेशनचे संचालक जयदीप पाटील व राजेंद्र पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.

प्रकाशन प्रसंगी कुलगुरूंनी “फुलताना” या पुस्तकाचे मन:पूर्वक कौतुक करतांना सांगितले की, “शिक्षकांनी अनुभव लेखनातून शिक्षणक्षेत्रात नवे दालन उघडावे. नव्या प्रयोगशील वृत्तीचे सदैव स्वागत आहे. ‘फुलताना’ हे पुस्तक केवळ शब्दांचे संकलन नसून, एका शिक्षकाच्या जिवंत अनुभवांची समृद्ध झलक आहे.”

  • प्रा. एस. टी. इंगळे यांनीही आपल्या मनोगतातून लेखकाच्या प्रयोगशीलतेचे व भावनात्मक लिखाणाचे विशेष कौतुक केले.
  • “फुलताना” हे पुस्तक प्राथमिक शिक्षक भरत पाटील यांनी मालेगाव तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या उपक्रमांची तसेच विद्यार्थी व पालकांसोबत आलेल्या दैनंदिन शालेय कामकाजातील अनुभवांची मांडणी असूनयातील लेख जीवन कौशल्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांचा पुरस्कार करतात. यावेळी नोबल फाऊंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांनी फुलताना हे वाचकांनी संग्रही ठेवावे असे आहे असे नमूद केले.”फुलताना” प्रकाशन सोहळा हा एक प्रेरणादायी व सृजनशीलतेचा उत्सव ठरला.

फोटो-
फुलताना या भरत पाटील लिखित पुस्तकाचे प्रकाशन डावीकडून प्रकुलगुरू एस.टी इंगळे,भरत पाटील, कुलगुरू विजय माहेश्वरी,नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील, राजेंद्र पाटील.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button