नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

रानडुक्कराच्या पिल्लाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला; पाचोरा वन विभाग आणि पोलिसांच्या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनने वाचवला


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा:पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली शिवारात मंगळवार, ३ जून २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एक चित्तथरारक घटना घडली. रानडुक्कराच्या पिल्लाचा पाठलाग करताना एक बिबट्या विहिरीत पडला. सदर घटना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना झाडे कटिंग करतांना समजली असता त्यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरशद मुलानी यांना कळवले. वन विभागाच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तीन तासांहून अधिक कालावधीच्या रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बिबट्याला सुखरूप बाहेर काढले.

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वन विभागाचे अधिकारी अरशद मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रोहिणी सोनार, हिरालाल पाटील, मुकेश बोरसे, गजानन आडवणे आणि प्रकाश सूर्यवंशी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बिबट्याला जेरबंद करून त्याला जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

या ऑपरेशन दरम्यान परिसरात जमावामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी जमावाला नियंत्रित करून ग्रामस्थांना सोबत घेत बिबट्याला बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली. पाचोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलीस कर्मचारी अशोक हटकर, योगेश पाटील, श्रीराम शिंपी, जितेश पाटील, रणजीत पाटील, समीर पाटील आणि प्रशांत परदेशी यांनीही या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. याशिवाय, गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल आणि महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. तर बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर विहिरीत पडलेल्या रानडुक्कर च्या पिल्लाला देखील सागर बाळतकर या युवकाने विहिरीत पडून पकडून सुखरूप बाहेर काढले आहे.

या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे बिबट्याचे प्राण वाचले असून, वन विभाग आणि पोलिसांच्या समन्वयाने केलेल्या या कामगिरीचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button