नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

गोराडखेडा येथे चक्रीवादळसदृश पावसाचा फटका; घरांची पडझड, फळबागांचे नुकसान, बैलाचा मृत्यू


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा| पाचोरा, १२ जून २०२५: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा गावात काल, ११ जून २०२५ रोजी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोराडखेडा बुद्रुक आणि खुर्द परिसरात घरांची पडझड होऊन वारा वादळ मध्ये पत्रे उडून फळबागांचे नुकसान तसेच एका शेतकऱ्याच्या बैलाचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोराडखेडा बुद्रुक येथील शेतकरी ईश्वर राघो पाटील यांच्या शेतात (गट क्र. १४८/२) वीज पडल्याने त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, गावातील अनेक घरांचे पत्रे उडाले असून, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि गावकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीची पाहणी आणि पंचनामा करण्यासाठी गोराडखेडा तलाठी मयुरी पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी नंदकिशोर पंचलींगे, गोराडखेडा तलाठी कार्यालयाचे कोतवाल ईश्वर पाटील, गोराडखेडा खुर्द सरपंच मनोज (आप्पा) उत्तमराव पाटील आणि गोराडखेडा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मराठे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनाम्याचे करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी आणि गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे पूर्ण करून आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे. “वादळामुळे आमच्या घरांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने लवकर मदत करावी,” अशी मागणी ईश्वर राघो पाटील यांनी व्यक्त केली. याठिकाणी तलाठी मयुरी पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकारी नंदकिशोर पंचलींगे यांनी नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक प्रशासनाने शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना लवकरच शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. गोराडखेडा खुर्द सरपंच मनोज पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मराठे यांनीही गावकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे कबूल केले आहे.

या नैसर्गिक संकटामुळे गोराडखेडा गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने त्वरित पावले उचलून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button