भारत स्वातंत्र्यापासून या गावात आजपर्यंत हिंदू मुस्लिम वाद कधी झालाच नाही! मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन!

पाचोरा: सन 1947 या वर्षी भारताला नव्हे तर पाकिस्तानलाही स्वतंत्र देशाचा दर्जा मिळाला व हिंदू जातीतील लोकांनी हिंदुस्थानामध्ये राहणे पसंत केले तर मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानात स्व:इच्छेने जाणे उचित मानले. परंतु फाळणी नंतरही भारतात अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी वास्तव करत होते आणि कालांतराने त्या मुस्लिम बांधवांनी हिंदुस्थानच आपला देश समजून या ठिकाणी आपल्या रितीरिवाजाप्रमाणे सण उत्सव साजरे करायला सुरुवात केली.

त्याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील इंग्रजांच्या काळातील राजधानी समजली जाणारे नंदीचे खेडगाव या गावांमध्ये स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत कधीही हिंदू मुस्लिम बांधवांचा वाद मोठ्या प्रमाणावर झाला नाही. याबाबत कुठेही अशी शासन दरबारी नोंद नसून या गावांमध्ये आजही हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने राहतात. या ठिकाणी मुस्लिम बांधव हिंदू रितीरिवादाप्रमाणे देखील मोठ्या प्रमाणावर त्यांचे उत्सव साजरे करतात यामध्ये विशेषतः अक्षय तृतीया प्रसिद्ध असा पोळ्याचा सण, दिवाळी व अनेक छोटे-मोठे सण हे आनंदात साजरे करतात.

आज दिनांक 15 मार्च 2025 रोजी खेडगाव नंदीचे गावातील मुस्लिम बांधवांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील हिंदू बांधवांनी उपस्थिती देऊन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यावेळी गावातील जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते त्याचा बरोबर आजी माजी सर्व पक्षीय पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते.