नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना जाहीर सूचना! ४ दिवस खरेदी विक्रीचे व्यवहार बंद.


Advertisements
Ad 4

पाचोरा: तमाम शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, व्यापारी असोसिएशन यांनी दिलेल्या पत्रानुसार वर्षा अखेरचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी दि.२९/०३/२०२५ पासून ते दि.०१/०४/२०२५ अखेर व्यापारी बांधव शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार करणार नाहीत. (दि.२९/०३/२०२५ शनिवार, दि. ३०/०३/२०२५ रविवार) तसेच बाजार समितीस दि.३१/०३/२०२५ रोजी रमजान ईद निमित्त सुट्टी असल्यामुळे तसेच दि.०१/०४/२०२५ रोजी बँकांचे आर्थिक व्यवहार बंद राहतील म्हणून शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल दि.२९/०३/२०२५ दि.०१/०४/२०२५ पर्यंत बाजार समितीमध्ये विक्रीस आणू नये. दि.०२/०४/२०२५ पासून बाजार समिती मध्ये शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरु रहातील याची नोंद असे अवाहन करण्यात आले आहे. तरी होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी वरील नमूद केलेय कालावधीत आणू नये याची नोंद घ्यावी व बाजार समितीस सहकार्य करावे असे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button