नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्याराज्य

पेन्शन योजनेमुळे पालिकेच्या १७ शिक्षकांचा होणार फायदा! आयुक्तांचा निर्णय; शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश


Advertisements
Ad 4

नवी मुंबई : महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सेवा देत असलेल्या १७ सहाय्यक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या आयुक्तांसह प्रशासनाचे शिक्षकांच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. विविध विभागांमधील कर्मचारी व संघटनांनी याविषयी पत्रव्यवहारही केले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया २००५ किंवा त्यापूर्वी राबविली होती. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, असा निर्णय शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेतला होता. त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांनीही केली होती. तिची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त शरद पवार, संघरत्ना खिल्लारे, शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी प्रस्ताव तयार करून आयुक्तांना सादर केला होता. किंवा त्यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविली होती. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, असा निर्णय शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेतला होता. त्याच्या अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला आता यश आले असल्याने समाधान आहे. याबाबत १३ मार्च २०२५ रोजी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १७ शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय १३ मार्चला घेतला आहे. या कर्मचाऱ्यांचे नव्याने भविष्यनिर्वाह निधी खाते उघडून त्यांचे अशंदान निवृत्ती योजनामधील खाते बंद करून त्यांच्या हिस्याची रक्कम नव्याने उघडण्यात येणाऱ्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश काढले आहेत.

आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी आम्ही केली होती. ती मान्य करून शिक्षणाधिकारी, शिक्षण, प्रशासन उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. यामुळे आमचे स्वप्न पूर्ण झाले असून याबाबत महापे शाळेचे शिक्षक दिपक बडगुजर यांनी आनंद व्यक्त करण्यात आला आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button