नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्यराष्ट्रीय

पाचोरा एसटी आगारात प्रवाशांच्या समस्यांबाबत ग्राहक पंचायतीचे आगार प्रमुखांना निवेदन


Advertisements
Ad 4

पाचोरा (मधुर खान्देश): अखिल भारतीय ग्राहक पंचायत, महाराष्ट्र प्रांताचे सचिव डॉ. अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा एसटी डेपोमधील विविध समस्या आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबत आगार प्रमुख प्रकाश पाटील यांना ९ मार्च रोजी निवेदन देण्यात आले. प्रवाशांच्या हितासाठी स्थानिक पातळीवर तातडीने सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनाद्वारे ग्राहक पंचायतीने डेपो प्रशासनासमोर विविध मागण्या केले आहेत यामध्ये आगार परिसरातील बंद असलेली पाणपोई त्वरित सुरू करणे, प्रवाशांसाठी पुरेशी वीज व्यवस्था आणि पंख्यांची सोय करणे. महिला प्रवाशांचे दागिने चोरी होणे आणि पॉकेटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी डेपो परिसरात CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांसाठी बस सवलतींचा लाभ वेळेवर मिळावा. अमृत योजनेतील (७५ वर्षांवरील) ज्येष्ठांना मोफत प्रवासाचे पासेस विनाविलंब उपलब्ध करून द्यावेत. शासनाने नवीन नियमानुसार लागू केलेले NCMC कार्ड निश्चित केलेल्या दरातच मिळावे. अधिकृत केंद्रांवर या कार्डासाठी जादा रक्कम आकारली जाऊ नये याची दक्षता घ्यावी. बस स्थानक परिसरात स्वच्छता राखणे, पार्किंग सुविधेचा विस्तार करणे आणि लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या वाढवणे.
यावेळी बोलताना ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने आगार प्रमुखांनी स्थानिक स्तरावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत. तसेच जिल्हा स्तरावरील मागण्यांचा पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.

याप्रसंगी परिवहन समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण (आबा) सूर्यवंशी, तालुका परिवहन समिती अध्यक्ष सुरेश तांबे, आणि अ.भा. ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button