नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल. इ १० वी व १२ वीच्या  विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन


Advertisements
Ad 4

पाचोरा : मार्च २०२५ मध्ये सी.बी.एस.ई. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षांमध्ये निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा आणि पाचोऱ्याचा गौरव वाढवला आहे. इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी शाळेतून एकूण १२४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि सर्वच विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवून १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यातील २१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून गुणवत्तेचा नवा उच्चांक गाठला आहे. या परीक्षेत कु. पार्थ मंगेशराव काळे याने ९७.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. श्रुतिका संदीप पाटील हिने ९५.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर कु. रीना राजू पटेल व कु. संकेत विनायक पवार या दोघांनी ९४.४०% गुण मिळवून संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकावला आहे. इयत्ता १२वीच्या परीक्षेत कु. हिमांशू अशोक सोनवणे याने ८०.८०% गुणांसह प्रथम क्रमांक, कु. अथर्व अश्विन वाघ याने ७१.६०% गुणांसह द्वितीय क्रमांक आणि कु. गायत्री कन्हैयालाल वाधवानी हिने ६५.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा सौ. वैशाली ताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेच्या अभ्यासक्रमातील सुसंगतता, शिक्षकांचे मेहनती मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत या घटकांमुळे हे यश शक्य झाले असून निर्मल इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा गुणवत्ता आणि उत्कृष्टतेचा नवा आदर्श प्रस्तुत केला आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button