नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
ताज्या बातम्याराज्य

….तू चाल रे गड्या तुला भीती कुणाची! अनिल महाजनांवर खडसे,भुजबळ,पंकजा मुंडेसह अनेक आमदारांकडून शुभेच्छा पत्रांचा वर्षाव.


Advertisements
Ad 4

खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा सारख्या गावात एका छोट्याशा कुटुंबात त जन्माला आलेला युवक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करतो अश्या कठीण प्रसंगातून प्रवास करत असतांना खऱ्या कार्यकर्त्याला त्रास सहन करावा लागतो यांत काही शंका नाही. मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता तसेच समाज सेवा करत असलेले अनिल महाजन यांची पुन्हा एकदा कोर्टाच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा पत्र देत “तू चाल रे गड्या तुला भीती कुणाची” या गाण्याची आठवण करून दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ राव खडसे, माजी मंत्री छगन भुजबळ त्याच बरोबर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते आमदार यामध्ये भाजपच्या नाशिक येथील आमदार देवयानी फरांदे तसेच जयंत पाटील,अमरीश भाई पटेल,राम कदम,महेश चौघुले अश्या विविध आमदारांचे शुभेच्छा पत्र अनिल महाजन यांना सामाजिक जबाबदारी उत्कृष्ट रित्या पार पाडत असून याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत .

ग्रामीण विकास, महिला आणि बाल कल्याण, आणि पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री म्हणून, पंकजा मुंडे यांच्या पावतीला मोठे महत्त्व आहे. त्यांचे हे पाऊल श्री अनिल महाजन सारख्या समुदाय नेत्यांचे महत्त्व दर्शवते, जे त्यांच्या समुदायाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतात.

पंकजा मुंडे स्वतः महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेत्या आहेत, ज्या ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणात त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. श्री अनिल महाजन यांचे अभिनंदन हे चांगल्या महाराष्ट्रासाठी त्यांचे दृष्टिकोन असलेल्या समुदाय नेत्यांना ओळखण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवते.

श्रीमती.पंकजाताई मुंडे यांनी श्री.अनिल विधान भवन मुंबई येथे प्रत्यक्ष भेटी दरम्यान अभिनंदन केले व शुभेच्छापत्र दिले.*

धन्यावद ताई साहेब

अनिल महाजन.
प्रदेश अध्यक्ष
महाराष्ट्र माळी समाज महासंघ.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button